स्वप्नातल्या
कळ्यांनो उमलू
नकाच केव्हा
गोडी अपूर्णतेची
लावील वेड जीवा
रेखाकृती सुखाच्या
चित्ती चितारलेल्या
साशंक कल्पनांनी
सहजी विरून
गेल्या
कधि सोशिला
उन्हाळा कधि
लाभला विसावा
नैराश्य कृष्णमेघी,
आशा कधी बुडावी
विरहात चिंब
भिजुनी प्रीती
फुलोनि यावी
काट्याविना
न हाती केव्हा
गुलाब यावा
सिद्धीस कार्य
जाता, येते
सुखास जडता
जडतेत चेतनेला
उरतो न कोणि
त्राता
अतृप्त भावनांनी
जीवात जीव यावा
|