या मीरेचे भाग्य उजळले
गिरिधर माझ्या स्वप्नी आले

आळवीत मी होते भजनी
देखियले नव्हते नयनांनी
आज मला ते सौख्य लाभले

व्यथा मनाची आता सरली
जननिंदेची भीती नुरली
भवसागर मी तरले तरले

मीरेसंगे नाचे मोहन
तालहि धरिती पायी पैंजण
रात संपली केव्हा नकळे
 
 
गीत - आत्माराम सावंत
संगीत - दशरथ पुजारी
स्वर - सुमन कल्याणपूर
For the printable version of this song, click here.