सीमा झाली सोसण्याची, परी दुःख संपले नाही
करिते जीवनाची भैरवी !
हे काय जीणे नित दुःख पिणे रडता रडता सुख भासविणे
नाति फिरली, प्रीती फिरली, माझे कुणी उरले नाही !
मज तार अता, वा मार अता, मन बावरले तनु सावरता
ही काय दशा, हे परमेशा, ये धावुनिया लवलाही !
गीत
-
यशवंत देव
संगीत
-
यशवंत देव
स्वर
-
आशा भोसले
चित्रपट
-
झाले गेले विसरून जा (१९५७)