निराधार आभाळाचा तोच भार साहे
बाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात
घरी रधिकेच्या परि ते वाढले सुखात
कर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे
भक्त बाळ प्रह्लादाला छळीले पित्याने
नारसिंहरूपे त्याला रक्षिले प्रभुने
अलौकिक त्याची मूर्ती अजुनी विश्व पाहे
साधुसंत कबिराला त्या छळिति लोक सारे
पांडुरंग रक्षी त्याला प्राशुनी निखारे
आसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे
गीत | - | मधुकर जोशी |
संगीत | - | दशरथ पुजारी |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
राग | - | बैरागी भैरव |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
प्रह्लाद | - | हिरण्यकशिपू पुत्र. याच्या रक्षणार्थ विष्णूने नारसिंहावतार घेऊन हिरण्यकशिपूस मारिले. |
त्यांच्यात चांगला गुणधर्म काय तर ते उत्तम गुणग्राहक आहेत. संगीतकार काय किंवा गायक, वादक काय; त्यांच्यात चांगल्या गोष्टी कोणत्या आहेत याची त्यांना जाणीव असे व त्याचा ते व्यवस्थित उपयोग करून घेत. त्यांचा स्वभाव तर फारच प्रेमळ, सतत हसतमुख. मजेमजेदार गोष्टी सांगायचे. त्यांच्या संगतीतला काळ म्हणजे आनंदाची पर्वणीच वाटे अगदी शांतपणे ते सर्वांची गाणी ऐकायचे. जोपर्यंत यशवंत देव रेडिओवर होते तोपर्यंत सर्वांनाच चांगले रिझल्टस मिळत गेले. उत्तमोत्तम अशी गाणी त्यांनी रेडिओकरता बसवली व ती खूपच लोकप्रिय झाली. अजूनही ती ऐकायला चांगली वाटतात. ते देव व मी पुजारी असं एक अतूट नातं निर्माण झालं होतं व अजून टिकून आहे.
(संपादित)
अजून त्या झुडुपांच्या मागे
संगीतकार दशरथ पुजारी यांचे आत्मकथन
शब्दांकन- वसंत वाळुंजकर
सौजन्य- आरती प्रकाशन, डोंबिवली.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.