लागले मन परतीच्या
कब रूठा लहरों से किनारा, कब रूठी सावन से धरती?
लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती
वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भिजवून जातो
अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती
नकोस थांबू पैलतटावर, पुन्हा मांडू ये डाव पटावर
पुन्हा सावरू जरी बहरले अडसर अवतीभवती
चुकले कोठे कधी कुणाचे या सार्याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती
विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मीपण, शरण तुला मी पुरती
लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकुळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती
वळीव वेडा आठवणींचा रोज अताशा भिजवून जातो
अर्ध्यारात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती
नकोस थांबू पैलतटावर, पुन्हा मांडू ये डाव पटावर
पुन्हा सावरू जरी बहरले अडसर अवतीभवती
चुकले कोठे कधी कुणाचे या सार्याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधित फिरती
विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मीपण, शरण तुला मी पुरती
गीत | - | गुरु ठाकूर |
संगीत | - | कौशल इनामदार |
स्वर | - | जान्हवी प्रभू-अरोरा, संजीव चिम्मलगी |
अल्बम | - | जान्हवी |
गीत प्रकार | - | भावगीत, मना तुझे मनोगत, नयनांच्या कोंदणी |
गात्र | - | शरीराचा अवयव. |
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.