क्षणभरी सोडुनी दूर तुला ।
राहिना कसा जीव पहा । कां रे सांग राजसा ॥
किती समयीं जरी झाला अबोला ।
जडतो कां तरी छंद तुझा हा ।
ना जाणे कशी वेल्हाळा । झाली वेडी राधिका ॥
गीत | - | मो. ग. रांगणेकर |
संगीत | - | मास्टर कृष्णराव |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
नाटक | - | कोणे एके काळी |
गीत प्रकार | - | हे श्यामसुंदर, नाट्यसंगीत |
त्यानंतरचे 'कोणे एके काळी' हे माझे नाटक १९५० सालच्या जानेवारी महिन्यात रंगभूमीवर आले. त्यातही 'एक होता म्हातारा' नाटकातील ज्योत्स्ना भोळे आणि चंद्रकांत गोखले हीच जोडी मुख्य भूमिकांसाठी घेतली होती. व्ही. डी. पंडीत हे खरे पाहता या नाटकाचे सूत्रधार होते. त्यांची भाऊकाकाची भूमिका हे या नाटकाचे मुख्य आकर्षण होते. काँग्रेसच्या दैनिकाच्या एका संपादकाच्या पूर्वायुष्यातील रंगेलपणाचा किस्सा हा या नाटकाचा गाभा होता. काँग्रेसवर आणि कम्युनिस्ट पक्षावर या नाटकात केलेली खुसखुशीत उपरोधिक टीका प्रेक्षकांना खूप आवडत असे. या नाटकालाही मा. कृष्णरावांनीच संगीत दिले होते. या नाटकातील खटकेबाज संवादाची अजून काही प्रेक्षक आठवण काढतात.
(संपादित)
मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' या मो. ग. रांगणेकर यांच्या पुस्तकातून. लेखन सहकार्य जयवंत दळवी.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्, पुणे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.