A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पवित्र तो देह

पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥१॥

तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकांच्या ॥२॥

देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥३॥

काय उरलें त्यां वेगळें आणिक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥४॥

तुका ह्मणे देव-भक्तांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥५॥
गीत - संत तुकाराम
संगीत -
स्वर- बबनराव नावडीकर
गीत प्रकार - संतवाणी
रज - धूळ.
भावार्थ-

  • जो नेहमी अच्युताचे नाव घेतो त्याचा देह पवित्र व वाणी पुण्यवान समजावी
  • त्याच्या चिंतनाने दोषी लोकांचा उद्धार होईल. त्यांच्या पापांचे ढीग जळून जातील.
  • अशा भक्तांच्या पायावरील धुलिकणासाठी देव इच्छा करून त्यांच्या मागे धावतात.
  • ज्यांच्या कंठात वैकुंठनायक आहे त्याचे देवाशिवाय निराळे काय उरले आहे !
  • तुकाराम महाराज म्हणतात, देव-भक्त आणि नामस्मरण यांचा संगम गंगा-यमुना व सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमाप्रमाणे पवित्र आहे.

गो. वि. नामजोशी
संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.