फुलवी तुझ्या स्मृतींच्या कलिका मनातल्या
येऊ कशी निघोनी पाऊल अडखळे
विरहात वेचिताना घटना सुखातल्या
उठता तरंग देही हळुवार भावनांचे
स्मरतात त्या अजुनी भेटी वनातल्या
हासोनिया खुणावी ती रात रंगलेली
तू मोजिल्यास होत्या तारा नभातल्या
गीत | - | उमाकांत काणेकर |
संगीत | - | श्रीकांत ठाकरे |
स्वर | - | शोभा गुर्टू |
राग | - | मिश्र भैरवी |
गीत प्रकार | - | भावगीत |
उर्दूवाली गजल काफियावाली होती म्हणून त्यांनी तशी लिहिली. या गजलला गैर-मुरद्दीफ गजल कहते है. जिच्यात रदीफ नसतो.
शोभाताईंची पहिलीच मराठी गजल खूप गाजली.
रेकॉर्डची एक बाजू साडेसहा मिनिटांची झाली की दुसरी बाजू तीन-तीन मिनिटांची असते. दुसर्या बाजूला, 'छेडिले ग, माझ्या मनी न होते' नि 'बोल कन्हैया का रूसला राधेवरी'.
ही रेकॉर्ड स्टॉक संपेपर्यंत खपली नि दुसरी-तिसरी ऑर्डर बुक्ड् झाली.
(संपादित)
श्रीकांत ठाकरे
'जसं घडलं तसं' या श्रीकांत ठाकरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- चिनार पब्लिशर्स, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.