नववधू प्रिया मी बावरतें
नववधू प्रिया, मी बावरतें;
लाजतें, पुढे सरतें, फिरतें.
कळे मला तूं प्राणसखा जरि,
कळे तूंच आधार सुखा जरि,
तुजवांचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरतें.
मला येथला लागला लळा,
सासरिं निघतां दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडितां कसें मन चरचरतें !
जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळें
पळत निघावें तुजजवळ पळें-
परि काय करूं? उरिं भरभरतें.
चित्र तुझें घेऊनि उरावरि
हारतुरे घालितें परोपरि
छायेवरि संतोष खुळी करिं
तूं बोलावितां परि थरथरतें.
अता तूंच भयलाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरें घर तें !
लाजतें, पुढे सरतें, फिरतें.
कळे मला तूं प्राणसखा जरि,
कळे तूंच आधार सुखा जरि,
तुजवांचुनि संसार फुका जरि,
मन जवळ यावया गांगरतें.
मला येथला लागला लळा,
सासरिं निघतां दाटतो गळा,
बागबगीचा, येथला मळा,
सोडितां कसें मन चरचरतें !
जीव मनींच्या मनीं तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळें
पळत निघावें तुजजवळ पळें-
परि काय करूं? उरिं भरभरतें.
चित्र तुझें घेऊनि उरावरि
हारतुरे घालितें परोपरि
छायेवरि संतोष खुळी करिं
तूं बोलावितां परि थरथरतें.
अता तूंच भयलाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरें घर तें !
गीत | - | भा. रा. तांबे |
संगीत | - | वसंत प्रभु |
स्वराविष्कार | - | ∙ लता मंगेशकर ∙ पं. कुमार गंधर्व ( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. ) |
गीत प्रकार | - | भावगीत |
टीप - • काव्य रचना- १२ ऑक्टोबर १९२०, ग्वाल्हेर. • स्वर- लता मंगेशकर, संगीत- वसंत प्रभू. • स्वर- पं. कुमार गंधर्व, संगीत- पं. कुमार गंधर्व. 'तांबे गीत रजनी' या पं. कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमातून. |
नोंद
आपली परमात्म्याच्या प्राप्तीविषयीची तळमळ किती दुबळी आहे व त्याच्याच प्रसादावाचून त्याची प्राप्ती कशी होणे नाही, हे या कवितेत सूचित केले आहे.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.
आपली परमात्म्याच्या प्राप्तीविषयीची तळमळ किती दुबळी आहे व त्याच्याच प्रसादावाचून त्याची प्राप्ती कशी होणे नाही, हे या कवितेत सूचित केले आहे.
- 'तांबे यांची समग्र कविता' मध्ये नमूद केलेली टिप्पणी.
तांब्यांच्या काही कविता वरवर प्रेमविषयक वाटतात. परंतु त्यांचा खरा विषय परमेश्वर भक्ती हा आहे. त्यांची सुप्रसिद्ध कविता 'नववधू प्रिया मी' ही अशी काविता मानण्यात येते. जीवात्मा हा वधू व परमात्मा हा वर. त्याचेकडे जायचे म्हणजे खरोखरच घरी जायचे. पण जीवात्म्याला या पृथ्वीवरील जीवनाचाच अधिक लळा लागला असल्याने 'तिकडे' जाणे कठीण वाटते. तो प्राणसखा आहे हे कळत असूनही त्याच्या जवळ जायला मन भिते, असा त्या रूपकाचा अन्वय लावता येतो. सरळ अर्थ असा व्यंजनेने सांगितल्याने व त्यातही नववधूचे रूपक मूळात चमत्कृतीपूर्ण असल्याने ही कविता चांगली उतरली आहे यात शंका नाही.
(संपादित)
(संपादित)
रामचंद्र श्रीपाद जोग
'तांबे यांची समग्र कविता' या पुस्तकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- व्हीनस प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.